Saturday, 11 July 2015
Friday, 8 May 2015
गाथा नं :१०१ "हजार अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ होय "
संदर्भ : धम्मपद खंड -२ : प्रकरण ८ :सहस्स वग्गो (सहस्त्र वर्ग )
श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असतांना तथागतांनी एक संन्यासी "बाहियदारूचिरीय" याला उद्देशून हि गाथा म्हटलेली आहे .
गाथा नं :१०१
"हजार अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ होय "
काव्यानुवाद :
अनर्थकारी पद युक्त हजार गाथा असती जरी ||
एकच गाथा श्रेष्ठ असे , जी ऐकूनी लाभे शांति खरी ||२||
भावार्थ :
अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथा जरी कोणी गायल्या तरी ,एकच गाथा श्रेष्ठ असे शकते जी ऐकुन माणूस उपशांत होतो .
नमो बुद्धाय
नमो धम्माय
नमो संघाय
जय भिम
Saturday, 3 January 2015
Tuesday, 30 December 2014
Monday, 21 July 2014
गाथा नं :. १६ " कुशल कर्म सुख देतात" (उपासक धम्मीकाची गोष्ट )
गाथा नं :. १६
" कुशल कर्म सुख देतात"
(उपासक धम्मीकाची गोष्ट )
" कुशल कर्म सुख देतात"
(उपासक धम्मीकाची गोष्ट )
काव्यानुवाद :
इहलोकी अन परलोकी , पुण्यवान हा मोदितसे ।
होई मोदित , प्रमोदित , पाहुनी निजकर्म शुद्ध ते ।।१६।।
भावार्थ :
कुशल कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो .
या हि लोकात आणि परलोकातही .
स्वत:हाचे पुण्यकर्म पाहून तो मोदित आणि प्रमोदित होतो
नमो बुद्धाय ।
नमो धम्माय ।
नमो संघाय ।
इहलोकी अन परलोकी , पुण्यवान हा मोदितसे ।
होई मोदित , प्रमोदित , पाहुनी निजकर्म शुद्ध ते ।।१६।।
भावार्थ :
कुशल कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो .
या हि लोकात आणि परलोकातही .
स्वत:हाचे पुण्यकर्म पाहून तो मोदित आणि प्रमोदित होतो
नमो बुद्धाय ।
नमो धम्माय ।
नमो संघाय ।
Saturday, 19 July 2014
गाथा नं :. १५ : "वाईट कृत्यातूनच दु:ख उदभवते "
गाथा नं :. १५
"वाईट कृत्यातूनच दु:ख उदभवते "
"वाईट कृत्यातूनच दु:ख उदभवते "
काव्यानुवाद :
इहलोकी अन परलोकी , उभयत्र पापी शोक करी ।
दु:ष्कर्म स्वत:च पाहुनिया , तो शोक पीडीत हो अंतरी ।।१५।।
भावार्थ :
पाप करणारा दोन्ही लोकात शोक करतो. या हि लोकात आणि परलोकातही . आपले दुष्ट कर्म पाहून तो शोक करतो आणि पीडीत होतो.
नमो बुद्धाय ।
नमो धम्माय ।
नमो संघाय ।
Thursday, 17 July 2014
गाथा नं . १४ : "मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "
गाथा नं . १४
"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "
"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "
काव्यानुवाद :
नीट छत ज्याचे साकरे , घरात त्या न वृष्टी शिरे ।
नीट जयाशी संवारिले , चित्ती अशा न राग शिरे ।।१४।।
भावार्थ :
एखाद्या घराचे छत साकारलेले असल्यास , त्या घरात जसे पावसाचे पाणी शिरू शकत नाही,त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास असलेल्या चित्तात तृष्णा किंव्हा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही .
नमो बुद्धाय
नमो धम्माय
नमो संघाय
Subscribe to:
Posts (Atom)