(यमकवग्गो)
----------------
गाथा नं . २
---------------
काव्यानुवाद :
--------------
मन उगम सर्व धर्मांचे , मन श्रेष्ठ मनोमय ।
मनाच्या प्रसन्नतेने , बोले जो वा कर्म करी ।
तयाशी सुख ना सोडी , छाया न संग सोडी जसे ।।२।।
भावार्थ :
---------
सर्व धर्म (चैतसिक अवस्था ) प्रथम मनात उत्पन्न होतात. मन हेच प्रधान आहे. ते सर्व धर्म मनोमयच आहेत.जेंव्हा एखादी व्यक्ती स्वच्छ मनाने बोलते किंवा तसे कार्य करते , तेव्हा सुख त्या व्यक्तीकडे असे धावते , जशी त्या व्यक्तीची छाया त्याची साथ कधी हि सोडत नसते.
---------------------
नमो बुद्धाय |
नमो धम्माय |
नमो संघाय |
साधू .साधू.. साधू ...

No comments:
Post a Comment